Uniform Civil Code आणि ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ नंतर आणखी एका गोष्टीची सध्या चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे आपल्या देशाच्या नावात ‘India’ वरून ‘भारत’ असा अधिकृत बदल करण्याची.
India to Bharat Name change संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात सरकार या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचा ठराव मांडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
India to Bharat Name Change Constitution
जर अशाप्रकारे आपल्या देशाचे नाव बदलून भारत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तर त्यासाठीची संविधानात लिहिलेली प्रक्रिया काय आहे आणि हा बदल कोठे केला जाऊ शकतो ते आपण खाली सविस्तरपणे पाहणार आहोत.
Table of Contents
Monthly Current Affairs
India आणि भारत ही नावे कुठून आली ?
देश ओळखण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वात जुन्या नोंदींमध्ये ‘भारत’, ‘भारता’ किंवा ‘भारतवर्ष चा वापर दिसून येतो. या सामान्यतः वापरल्या जाणार्या संज्ञांना ‘India’ बरोबरच संविधानात स्थान मिळाले आहे.
भारत, देशाचे एक संस्कृत नाव, प्राचीन पुराणिक साहित्यातून आले आहे आणि भारतातील दोन प्रमुख महाकाव्यांपैकी एक – महाभारत ज्यामध्ये भारतीय हे राजा भरताचे वंशज आहेत असे मानले जाते, या राजाने भारतीय वंश सुरू केल्याचा दावा प्राचीन पुराणिक साहित्यात केला जातो.
‘India’ नावाचा उगम सिंधू नदी (आताची सिंधू) पासून आहे. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून जेव्हा देशावर ब्रिटीशांचे राज्य होते तेव्हा ‘इंडिया’ या इंग्रजी रूपाला अधिक प्रासंगिकता प्राप्त झाली आणि ऐतिहासिक नकाशांमध्ये ठळकपणे ते नाव वापरण्यात आले.
India हे नाव सध्या कुठे वापरले जाते ?
प्रजासत्ताक, त्याची मंत्रालये, देशांतर्गत आणि परदेशी पत्रव्यवहार आणि सरकारी व्यक्तींचे भारतीय नेते म्हणून वर्णन करताना इंग्रजीतील देशाच्या सर्व अधिकृत दस्तऐवजांमध्ये इंडिया हे नाव आहे.
- देशासाठी इंग्रजीतील सर्व अधिकृत कागदपत्रांवर India हे नाव आहे.
- प्रजासत्ताक, त्याची मंत्रालये, देशांतर्गत आणि परदेशी पत्रव्यवहार आणि सरकारी व्यक्तींचे भारतीय नेते म्हणून वर्णन करताना India हे नाव वापरले जाते.
- पासपोर्ट आणि मतदान कार्ड यांसारखी वैध ओळखपत्रे नागरिकत्वाचे अधिकृत कागदपत्रांवर India हा शब्द वापरतात.
- परंतु हिंदीमध्ये प्रकाशित दस्तऐवज,आणि कागदपत्रांवर, India ऐवजी भारत असे नाव वापरले जाते.
सध्य स्थितीला संविधानात काय लिहीले आहे ?
भारतीय संविधानाच्या कलम 1 मध्ये ‘India, म्हणजे भारत, राज्यांचा संघ आहे’
India, that is Bharat, shall be a Union of states असा उल्लेख आहे. म्हणजेच संविधानाने India आणि भारत या दोन्ही नावांना अधिकृत नावे म्हणून मान्यता दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी काय म्हटले आहे ?
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दोनदा ‘इंडिया’चे नाव बदलून ‘भारत’ ठेवण्याच्या याचिका फेटाळल्या आहेत, एकदा 2016 मध्ये आणि नंतर 2020 मध्ये.
2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की अशा याचिकांवर विचार केला जाणार नाही. त्यात याचिकाकर्त्याला सांगण्यात आले की, जर त्यांना देशाला भारत म्हणायचे असेल तर ते तसे करू शकतात आणि जर एखाद्याला India म्हणायचे असेल तर तसे म्हणू शकतात.
“Bharat or India? You want to call it Bharat, go right ahead. Someone wants to call it India, let him call it India”
[Supreme Court in 2016]
2020, मध्ये आपल्या निकालात, याचिका फेटाळताना, भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले,
“भारत आणि India ही दोन्ही नावे घटनेत दिलेली आहेत… भारताला घटनेत आधीच ‘भारत’ म्हटले गेले आहे.”
[Supreme Court in 2020]
संविधानानुसार देशाचे नाव बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ?
देशाचे नाव बदलून भारत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तर त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. घटनादुरुस्ती करणे असामान्य नाही. २०२१ पर्यंत राज्यघटनेत १०५ दुरुस्त्या झाल्या आहेत. परंतु संसदेत विधेयक मांडले जाणे आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांतील किमान दोन तृतीयांश सदस्यांनी मंजूर करणे आवश्यक आहे.
संसदेत घटनादुरुस्ती संमत झाल्यानंतर, विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी, आवश्यक तेथे राज्य विधानमंडळांद्वारे त्यास मान्यता देणे आवश्यक आहे.
कोणत्या कलमामद्धे दुरुस्ती करावी लागेल ? India to Bharat Name Change
हे साध्य करण्यासाठी राज्यघटनेच्या अनुच्छेद १ मध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारला विधेयक आणावे लागेल. या साठी कलम 368 अंतर्गत दुरुस्तीसाठी करावी लागेल.
भारतीय राज्यघटनेच्या भाग XX च्या कलम 368 मध्ये तीन सुधारणांची तरतूद आहे.
- कलम-368 अंतर्गत दुरुस्तीसाठी साधे बहुमत (Simple majority)
- कोणत्याही राज्याचे नाव बदलणे, नवीन राज्ये बनवणे आणि इतर वेळी याचा वापर होतो.
- सदस्याच्या ५०% पेक्षा जास्त मतांची आवश्यकता असते.
- कलम-368 अंतर्गत दुरुस्तीसाठी विशेष बहुमत (Special Majority)
- देशाचे नाव बदलणे, न्यायाधीशांवरील अविश्वास ठराव आणि इतर काही महत्वाच्या वेळी याचा वापर होतो.
- विशेष बहुमत म्हणजे दोन्ही सभागृहातील 2/3 बहुमत.
- एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्यांच्या मंजुरीसह संसदेच्या विशेष बहुमताने.
India to Bharat Name Change Process As per Indian Constitution घटना दुरुस्तीची प्रक्रिया
Step 1 : हे विधेयक संसदेच्या दोन्हीपैकी एका सभागृहात मांडले जाते.
Step 2 : विधेयक एकूण बहुमताने total majority (रिक्त किंवा गैरहजर असले तरीही) आणि दोन्ही सभागृहांनी उपस्थित असलेल्या आणि मतदान केलेल्या लोकांच्या 2/3 पेक्षा बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे. दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद असल्यास संयुक्त बैठकीची तरतूद नाही.
Step 3 : प्रत्येक सभागृहाने स्वतंत्रपणे विधेयक मंजूर करणे आवश्यक आहे. जर विधेयक संविधानाच्या संघीय तरतुदींमध्ये सुधारणा करू इच्छित असेल, तर निम्म्या राज्यांच्या विधानसभांनी साध्या बहुमतानेही ते मंजूर होणे आवश्यक आहे.
Step 4 : बहुमत प्राप्त केल्यानंतर, विधेयक राष्ट्रपतींसमोर सादर केले जाते जे नंतर विधेयकाला आपली संमती देतात. अश्या वेळी राष्ट्रपती विधेयकाला दिलेली संमती रोखू शकत नाही किंवा संसदेच्या पुनर्विचारासाठी विधेयक परत करू शकत नाही.
Step 5: राष्ट्रपतींच्या संमतीनंतर हे विधेयक कायदा बनते.
जगातील इतर देश ज्यांनी त्यांची नावे बदलली
जगात आत्तापर्यंत बऱ्याच देशांनी त्यांची देशाची नावे बदलली आहेत. त्यातील काही देशांची यादी खाली दिली आहे.
देशाचे आधीचे नाव | देशाचे आताचे नाव | नाव बदलले वर्ष |
---|---|---|
Turkey | Turkiye | 2022 |
Holland | The Netherlands | 2020 |
Ceylon: | Sri Lanka | 2011 |
Siam | Thailand | 1939 |
Persia | Iran | 1935 |
Burma | Myanmar | 1989 |
Cape Verde | Republic of Cabo Verde | 2013 |
Irish Free State | Ireland | 1937 |
Swaziland | Eswatini | 2018 |
Democratic Kampuchea | Cambodia | 1989 |
Macedonia | Republic of North Macedonia | 2019 |
Czech Republic | Czechia | 2016 |